Sunday, April 28, 2013

आपला अक्साई चीन !

 सध्या वर्तमान पत्रांमध्ये आपण चीन ने भारताची सीमा रेषा ओलांडली याबाबतीत अनेक बातम्या वाचत आहोत!  भारताचा काही भूभाग हा चीन सारखा लबाड देश ५० च्या दशक पासून ताब्यात घेऊन बसला आहे! मनुष्याची विरळ वस्ती असलेला भाग खरेतर खूपच सुंदर आहे ! म्हणूच या सुंदर अश्या प्रदेशाबाबत जाणून घायची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली ! काय आहे तेथील परिस्थिती ? आपल्या भारताचा भाग असेलेल्या त्या प्रदेशा बद्दल खरेच खूप काही जाणून घ्यायची इच्छा निर्माण झाली ! भारताच्या या भागाचे नाव आहे " अक्साई चीन" . भारताचे चीन बरोबर जे युद्ध झाले होते ते याच भागात आणि याच भाग साठी!
                                             





नकाशात दाखवल्या प्रमाणे तुम्ही हा भाग ओळखला असेल ! . इयत्ता ५ वी पासून आपण भूगोल मध्ये हा भाग जम्मू - काश्मीर या राज्याचा भाग म्हणून पाहतो! परंतु या प्रदेशावर  सध्या चीन चे नियंत्रण आहे.  खरेतर अक्साई चीन हा लडाख जवळील प्रदेश आहे ( हो हो!! ३ इडीय्ट्स मधलेच लडाख) त्यामुळे आपल्याला हा प्रदेश किती सुंदर असेल याची थोडी फार कल्पना तर नक्कीच आली असेलच. सर्वप्रथम या प्रदेशाच्या नावाचा अर्थ सांगतो अक्साई हा भारतीय किवा चीनी शब्द नाही तर तो चक्क तुर्की शब्द आहे! झालात न चकीत ! परंतु अक्साई ची तुर्की मधली फोड "अक" आणि "साई" अशी होते , त्याचा मराठीतील अर्थ अक म्हणजे "सफेद" आणि साई म्हणजे " दरी अथवा घाट" म्हणजेच "सफेद दरी अथवा सफेद घाट". तसेच "चीन" हा शब्द "चीराना" या तुर्की शब्दाचा अपभ्रंश आहे . या चीराना शब्दाचा मराठीत अर्थ होतो " उजाड जागा " . परंतु चीन चे सरकार मात्र भारताच्या या प्रदेशावर आपला अवैध हक्क दाखवण्यासाठी या प्रदेशाचा नावाचा पण गैरवापर करते व या प्रदेशाच्या नावाचा अर्थ " चीन चे उजाड सफेद वाळवंट" असा काढते !
                                                

भौगोलिक दृष्ट्या हा भाग तिबेट च्या पठारी भागात मोडतो ! अक्साई चीन मध्ये एक नदी आहे त्याचे नाव देखील "अक्सेचीन" असे आहे! येथे हिमवर्षाव नाही होत तसेच येथे पाऊस देखील नाही पडत ! अतिशय उंच असलेला हिमालय पर्वतामुळे! या भागात मनुष्याची वस्ती नाही. भारत किवा चीन यापैकी कोणत्याच देशातील लोक येथे राहत नाही. हा भाग निर्मनुष्य आहे. परंतु येथे सतत अस्तित्व असते लष्कराचे.या प्रदेशात बहुदा प्रवासासाठी सायकल चा वापर सुद्धा करण्यात येतो ! येथूनच चीन भारताची एल. ओ. सी. भंग करतो. नुकताच चीन ची काही हेलिकॉपटर अक्साई चीन भागातून भारतीय हद्दीत घुसली तसेच तेथून जेवणाचे पाकिटे तसेच काही पत्रकांचे पाकिटे भारताच्या हद्दीत टाकून निघून गेले. नंतर काही दिवसांनी बातमी आली ( जी आपण सध्या वाचत आहोत) कि चीनी सैन्य भारताच्या हद्दीत १० किमी भागात घुसले आहे ते देखील या प्रदेशाची सीमा मोडून ! व आता येथून मागे जायलाच तयार नाही. दोन्ही सैन्यामध्ये वरिष्ठ लोकांची या विषयी चर्चा झाली परंतु काहीही तोडगा निघाला नाही ! चीन शेवटपर्यंत असेच म्हणत होता कि त्यांही सीमा ओलांडली नाही ! 


अक्साई चीन हा भारताचाच भाग आहे यात शंका नाही. फाळणी होण्यापूर्वी ब्रिटीश अधिकार्यांनी नकाशाचे मापन करताना हा प्रदेश भारताच्या ताब्यात दिलेला आहे. परंतु आफ्रिदी लोकांनी १९४८ मध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये काश्मीरचा  काही भूभाग हा त्यांचा ताब्यात गेला आहे जो आज आपण पाक व्याप्त काश्मीर या नावाने ओळखतो.व उरलेल्या काही भागावर म्हणजेच अक्साई चीन वर सध्या चीन चे नियंत्रण आहे! विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे चीन चा "खास" मित्र असलेल्या पाकिस्तानला अक्साई चीन हा प्रदेश चीन च्या ताब्यात असणे याबाबतीत फारशी उत्सुकता नाही , ते असेच पकडून चालतात की काश्मीर मध्ये हा प्रदेश नाही आहे तो चीन चा ( तिबेट) चा प्रदेश आहे!  (अर्थात याच्या मोबदल्यात त्यांना चीन कडून प्रचंड प्रमाणात मदत मिळते !)  



                            

अक्साई चीन हा भारताचा प्रदेश जरी निर्मनुष्य असला तरीपण सुंदर आहे, येथील वातावरण तसेच अनेक भौगोलिक गोष्टी खरेच खूप छान आहे! परंतु आपले दुर्दैव की आपल्या स्वतःच्या देशाचा हा भाग असूनही आपल्याला येथे जाता येत नाही ! मला देखील एकदा येथे जायला नक्की आवडेल ! परंतु सध्या तरी लष्करी परिस्थिती मुळे ते शक्य होणार नाही ! पण तरी सुद्धा मी माझी हौस YouTube द्वारे पूर्ण केली आहे. अक्साई चीन हा भारताचा भाग असलेला प्रदेश कसा आहे यावर अनेक YouTube video उपलब्ध आहे!  सध्या तरी दोन्ही देशातील तणावपूर्ण संबंध शांततेच्या मार्गाने कसे सुधारतील हे पाहणेच आपल्या हातात आहे! :)
   
                                                   

No comments: