Thursday, February 3, 2011

थरारक पेब

थरारक पेब


या सीज़न मधला शेवटचा ट्रेक हा माथेरान नजिक असलेल्या " पेब गडावर" झाला. अणि योगायोग म्हणजे आमच्या कॉलेज ग्रुप बरोबरचा पहिला ट्रेक सुद्धा हाच झाला ! परन्तु खरे सांगायचे झाल्यास पेब ला "विकट गड " का म्हणतात हे आपल्याला समजेल जेव्हा आपण स्वतः तिथे जाल ! असेच आम्ही खुशीत खुशीत आदल्या दिवशी मस्त डोम्बिवलीला भेटून सगळी पुर्वतयारी केलि ! सगळी प्लानिंग चोख पणे पर पडली ! काही चुक होणे शक्य नव्हते ! अणि या खुशीत ती रात्र घालवली ! सकाळी :३१ (मुलुंड) ची ट्रेन पकडून आम्ही साधारण एक :१५ पर्यंत पोहचलो ! ट्रेन डोम्बिवली येताना थोडासा गोंधळ झाला मित्रांचा डबा पकडायला ! या ट्रेक ला नेहमी प्रमाणे "Introduction " काही झाले नहीं ! कारन सगले माझे कॉलेजचे मित्र होते ! आम्ही जन थाबलो होतो नेरल ला आमचा मित्र प्रषिक अणि सिद्धांत ची वाढ बघत ! तरी ट्रेक ला आम्ही असे मित्र होतो सिद्धांत , प्रषिक , सुश्रुत , हेरम्ब , दत्ता, अमित ,सौमित्र ,प्रसाद , निनाद (मी!) आम्हाला रास्ता माहित होता ( निदान मला तरी सुरवात! ) असे करत करत आम्ही विजेच्या खाम्बंचा मागोवा घेत घेत नेरल स्टेशन ला राम राम केला ..अणि चालू लागलो !


रस्त्यात टपरी दिसली ! अणि पावले सहज तिच्या कड़े निघाली ! थोड्या फार चाह पाना नंतर आम्हाला आमचा नेहमीचा पहिला विजेचा खाम्ब लागला..! गेल्या वेळेस च्या अनुभवानुसार आम्ही बरोबर जात होतो ! आता आम्ही अजुन पुढे जात होतो गप्पा गोष्टी मजा मस्ती धमाल करत करत ! विचार करत होतो की कॉलेज मधे आताकाय चालू असेल ? कारन आजच्या ट्रेकिंग चा प्लान हा कॉलेज ला दांडी मारून झाला होता ! आता आम्ही बरोबर जात होतो अणि तेव्हढ्यात आम्हाला आमची दूसरी LANDMARK म्हणजे आमची दरी लागली !


या दरी कडून वाटा जातात ! वाट वर जायला आहे जी धब्ध्ब्याला जाउन मिलते जो पूर्ण पणे ROCK PATCH आहे अणि दुरसी वाट जंगलात आहे ! खुप खोल जंगल ! अणि नेमके इथेच माझ्या स्मरण शक्तिने मला धोका दिला ! आम्ही जंगलात जाण्याचे सोडून कड़क +उंच ( भयानक ??) असलेल्या ROCK PATCH वरून गेलो.. ! ROCK PATCH सुरु झाला होता असे करत करत आम्ही वर चढत होतो.. अणि कठिन म्हणजे एकदम कठिन असा ROCK PATCH आम्हाला लागला होता ! त्यात बहुतेकांचे अवसान गलाले ! सर्वाना वाटत होते की आता नहीं चढू शकणार ! सिद्धांत अणिप्रषिक मात्र जिव तोड़ मेहनत करून आधी स्वतः चढत होते अणि मग सर्वाना चढवत होते ! दत्ता देखिल मस्त चढात होता ! अणि आम्हाला आमचा सर्वात खतरनाक पॉइंट लागला !
माझा स्वताहाचा हात तिथून घसरला अणि मी पडणार एवढ्यात दत्ता ने मला पकडले ! नाहीतर आज मी हा ब्लॉग लिहू शकलो नसतो ! नविन रास्ता शोधण्याचा पराक्रम करू पहाणाऱ्या आम्हाला खुप मोठी कीमत चुकवावी लागली असती ! हे होते न होते तोवर सौमित्राचा हात घसरला अणि तो......... -३० फुट खली जाउन पडला.! त्याहे केवल नशीब होते म्हणून तो काही फूटानवर असलेल्या दरीत पडला नाही ! अणि मग त्याला बाहेर कध्न्य साथी मी अणि दत्ता पुढे सरकलो ! तेव्हा मागे पाहतो तर हेरम्ब अणि सिद्धांत च काहीच पत्ता नाही त्यांच्या फ़ोन लगत नव्हता त्यांचा आमच्या ग्रुप बरोबर च CONTACT तुटलेला ! सौमित्र जीवन मरणशी खेल्तोय अणि दुसर्यांचा कही पत्ता नाही !

एवढे होउनही सौमित्र ला जोक सुचत होता तो म्हणत होता लवकर हेलिकोप्टर बोलवा ! आम्ही मात्र तश्या बेतात नव्हतो ! आता मी काय करू ? जवाब्दारीच्या जाणिवेने मला चिंतेत घेरले ! आशय वेळेस मी अणि दत्ता पुढे होऊं सौमित्र ची मदत करायला गेलो.. त्याचा हात कधीही सुटला असता अणि तो पडला असता ! मी जाउन त्याची बैग पकडली अणि दत्ता ने आपला जिव डोक्यात घालून त्याला आनले वर ! अखेर तो आर आला .. अणि मेन म्हणजे सिद्धांत अणि हेरम्ब शी contact झाला .. दूर जंगला मधून त्यांची हाक ऐकू आली अणि माझ्या जीवत जिव आला ! आता आम्ही उतरायची तयारी केलि ! फ़ोन वरून समजले की शिखर पासून कही अंतरावर असतानाच केवल ख़राब वाटे मुले आम्हाला वर पोहचता आले नाही ! तरी द्त्तगुरुंचे स्मरण करून , त्याना वंदन करून आम्ही उतरायला सुरवात केलि ! एक उत्तम ट्रेकर तेव्हाच बनू शकतो जेव्हा तो नीट उतरु शकतो कारन जास्त अपघात हे उतर्तानाच होतात ! अणि असे करून आम्ही १ -१ करत उतरु लागलो ! अखेर सिद्धांत अणि हेरम्ब येउन मिळाले ! अणि मग पटापट खाली उतरून जेवण केले अणि लवकरात लवकर शाक्य तितक्य लवकर नेरल स्टेशन गाठायचे ठरवले . रस्त्यात १ विहीर लागली तिथे पानी प्यायले अणि स्टेशन वर बसून आराम केला !

(आम्ही इथ पर्यंत पोहचून माघारी फिरलो )
खरेच ट्रेकिंग हा माझा शौक माझ्या स्वतहाच्या जीवा वरही बेतु शकतो हे मी आज पहिल्यांदा अनुभवले ! म्हणून ट्रेक ला जाणार्या लोकानी ही पोस्ट वाचून P.E.B. ला जाताना सावधानता घाय्वी अणि धब्धाब्याच्या रस्त्याने कधीही जाऊ नए ! तो जवळ चा रास्ता असला तरीसुद्धा ! ते तुमच्या जीवा वरही बेतु शकते ! कारण घरी जाता जाता माझ्या अंगावरचा काटा अजुन गेला नव्हता ..! कारन का त्या दिवशी मी स्वः माझ्या मृत्युला माझ्या डोळ्यानी बघितले होते !

4 comments:

हेरंब said...

न चुकता पेब सर करणं ही जवळपास अशक्य गोष्ट आहे. मी पाचदा गेलो आहे. आणि पाचही वेळेला चुकलो आहे. एकतर चढताना तरी किंवा उतरताना तरी. त्या मधल्या पठाराशी पोचल्यावर हमखास चुकायला होतंच !

Rasika Kale said...

hussh...!!!! ninad...tusi gr8 ho...!!! devache anek anek dhanyawad.... :)

निनाद गायकवाड said...

thanx rasu :D
thanx हेरंब :)

विनित said...

pahilyanda jal tevha vatadya ghevun jat ja....!!!