Friday, December 30, 2011

घोडचूक !


घोडचूक !

हो मी याला घोड्चुकच म्हणीन ! आज अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने सारा देश पेटून उठला आहे ! सरकार ने लोकपाल बिल संसदेत आणले ( परंतु ते अण्णा हजारे यांच्या लोकपाल प्रमाणे नव्हते ) म्हणून त्यांनी पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारले ! वास्तविक मला त्यांचे आंदोलन चुकीचे वाटते ! कारण जनतेला काय हवे आहे हे जनतेने निवडून दिडलेले लोकप्रतिनिधी ठरवणार ! याचा हक्क फक्त त्यांना आहे ! जर असे उपोषण केल्याने कायदे बनत असते तर भारतीय जनता पार्टी वाले पुहा उपोषणाला बसून पोटा कायदा अन्य साठी सरकार वर दबाव आणू शकले असते ! म्हणून उपोषण करून संसदेस वेठीस धरणे हा संसदेचा तसेच लोकशाहीचा अपमान आहे ! अतिशय चुकीचे आहे !



याच्या वर परत अण्णा हजारे यांनी २७ डिसेंबर पासून ३ दिवस उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले ! खरे तर ते इथेच फसले ! त्याच्या या दुसर्या संघर्ष फसण्याची काही कारणाचा मी विचार केला !
१) अण्णा हजारे यांचे आंदोलन यशस्वी होण्यामागे ७० % हून अधिका वाट आहे सोशल मिडिया चा .. परंतु या आंदोलनात मात्र फारसा प्रचार केला गेला नाही !
२) संसदेचे कामकाज अतिशय घाई घाई ने करण्यात आले कारण लगेच नाताळ ची त्याच प्रमाणे नवीन वर्षाची सुट्टी लागणार होती !
३) अण्णा हजारे नेमके हेच विसरले ! त्यांना वाटले कि मुंबई ची जनता सुद्धा राळेगण सिद्धी सारखी त्यांच्या पाठीशी कधीही केव्हाही उभी राहील !
४) परंतु ज्या तरुणाईचा अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठींबा होता ती आता नवीन वर्षाच्या सुट्टी ची तयारी करण्यात मग्न झाली होती ! सहजच तरुणाचा प्रतिसाद कमी मिळाला होता !
५) अण्णा हजारे यांचे आंदोलन हे १६ ऑगस्ट प्रमाणे बेमुदती नव्हते ! ठराविक कालावधी साठी होते त्यामुळे काही लोकांचा तसेच राजकारण्यांचा काहीसा रस निघून गेला ! कारण त्यांना माहित होते कि ३ दिवसा नंतर अण्णा हजारे यांचे उपोषण संपणार आहे !
६) दिल्ली प्रमाणे मुंबईत देखील थंडीची लाट आली आहे त्यामुळे सामान्य मुंबईकर घराबाहेर पडताना सहसा दिसत नाही !
७) ज्या मैदानावर अन्नाचे आंदोलन झाले तिथपासून स्टेशन अतिशय लांबवर होते ! त्यामुळे तिथे पोचणे सहसा सोपे नाही !
८) आंदोलन अतिशय घाई घाईत केले गेले ! तसेच अण्णा हजारे यांची प्रकृती बरी नसताना देखील त्यांना उपोषणाला बसायला लावले !
९) मागील काही दिवसान पासून टीम अण्णा च्या सदस्यांची बिघडलेली छबी तसेच अण्णा हजारे यांच्या ब्लॉग वरून झालेला राजू परुळेकर यांचा विवाद !


म्हणून लोकपाल च्या मुद्द्यावर मी सांगू इच्छितो कि जर का पुन्हा एखादे आंदोलन करायचे असेल तर ते घाई घाईत न करता सावकाशपणे विचार विनिमय करूनच करावे !
गेल्यावेळेस यशस्वी झालेले केजरीवाल भूषण तसेच बेदी ना या संग्रामात मात्र सपशेल अपयश आले ! जाता जाता असाच विश्वास व्यक्त करूं कि पुढील वर्षात १ मजबूत लोकपाल बिल नक्की आपल्याला पहावयास मिळेल !

Thursday, November 24, 2011

जरा कौतुक ट्वीटर चे !


जरा कौतुक ट्वीटर चे !

आजच्या युवा पिढीचे दर्शन घडवणारे खरे साधन मी ट्वीटर ला मानतो ! खरे सांगायचे झाले तर तरुणाच्या अनेक समस्या तसेच अनेक सामाजिक प्रश्न फेसबुक पेक्षा ट्वीटर वर जास्त लोकप्रिय होत आहेत ! बॉम्बस्फोट च्या वेळेस देखील मी पाहिलेले कि दर २ मिनिटाने लोक आपले स्टेटस अपडेट करत होते कि मी मी अंधेरी ला जात आहे कोणाला रस्त्यात सोडू का ? मी डॉक्टर आहे कोणाला मदत हवी आहे का ? फक्त एका टिचकीने एखादी माहिती काही सेकंदात देशाच्या कानाकोपर्यात जाऊन पोहचते ! खरेच किती कौतुक करावे अश्या तंत्रज्ञानाचे !
खरे सांगायचे झाले तर अश्या गोष्टींमुळे अनेक गोष्टीना वाचा फोडता येते ! ज्या लोकांना ब्लोग न लिहिता आपली मते मांडायची असतात सध्या सोप्या भाषेत त्यांच्या साठी ट्वीटर हा एक चांगला उपाय आहे ! त्याचप्रमाणे एकाद्या चालू घडामोडीवर भाष्य करण्या साठी देखील हे एक चांगले साधन आहे ! आणि सर्वात महत्वाचे म्हणजे FILMSTAR लोक हे ट्वीटर वर आहेत.. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आपल्या फिल्मस्टार सोबत सरळ थेट संवाद साधता येतो ! फेसबुक पेक्षा ट्वीटर जास्त लोकप्रिय झाले ते याचमुळे !
त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे नाण्याच्या २ बाजू असतात.. त्याचप्रमाणे याची देखील दुसरी बाजू आपल्याला बघायला हवी.. ते म्हणजे चुकीचे वक्तव्य करून काही जणांना त्यासाठी भोगावे देखील लागले आहे! कारण आपण जे बोलतो त्यावर लोक सहमत असतीलच असे नाही ! म्हणूनच मतांबद्दल नाही , तर माहिती देवाण घेवाण करण्यासाठी हेय एक उत्तम तंत्रज्ञान आहे !
मागील पोस्ट मधे सांगितल्या प्रमाणे आंबोली खून प्रकरण म्हणजेच छेडछाडीचा विरोध करणाऱ्या "किनन - रुबिन " या मित्रांच्या हत्येमुळे सगळे मुंबईकर हादरले होते ! त्या मोहिमेला देखील ट्वीटर मुळे अधिक प्रसिद्धी मिळाली.. नाहीतर त्या दोघा निष्पाप तरुणाचे बलिदान व्यर्थ गेले असते ! एकूणच माहितीची देवाण घेवाण करण्या साठी ट्वीटर हे एक चांगले साधन मानले गेले पाहिजे !

Sunday, November 20, 2011

अंतराळ !

अंतराळ !
आज एक वर्षांनी "अंतराळ - खगोलशास्त्र - परग्रही जीव " अश्या माझ्या आवडत्या विषयावर लिखाण करायचा योग आला आहे ! इत्तके वाचन + लिखाण करून सुद्धा माझ्या मनात प्रश्न येतोच कि या जगात आपण एकटे आहोत का! कि कोणी तरी आपल्याला बघ्टेल ? ऐकतेय किवा आपल्यावर नजर ठेवून आहे ! अश्या गोष्टींचा विचार करता करता माझे मन मला भूतकाळात घेऊन जाते ! जर परग्रही जीव खरेच आहेत आणि ते पृथ्वी वर आले तर काय होईल ? या बाबतीतील बहुतांश फिल्म्स मी पहिल्या आहेत ! त्यात एकच गोष्ट असते ते म्हणजे एक माणूस अंधाऱ्या रात्रीतून रस्ता हरवतो त्याला परग्रही जीव आपल्या सोबत नेतात ! खरे सांगू जर आपण परग्रही जीवांच्या दृष्टीने विचार केला तर मला या विषयात अजिबात स्वारस्य नसते ! कारण लाखो प्रकाशवर्षे प्रवास करून "पृथ्वी" वर आलेल्या परजीवी लोग फक्त एका माणसाला घेऊन जाणार नाही ! या कल्पनेत जरा सुद्धा दम नाही !


आता आपण येऊया परग्रही लोकांच्या अस्तित्वाच्या शक्यतेवर ! माझ्या मते तरी आपण याची पुढीलप्रमाणे विभागणे करू शकतो
) ते आपल्यापेक्षा प्रगत नसतील
) ते आपल्याहून अनेक पतीने प्रगत असतील

या दोन शक्यतांचा मी विचार का करतोय कारण )" जर ते आपल्या एवढे प्रगत नसतील तर आपण पाठवलेले संदेश त्यांना पोचले असतील तरीसुद्धा ते ऐकू किवा पकडू शकणार नाही "( इंजीनीअरिंग मध्ये आम्ही याला Encoding -Decoding असे म्हणतो ).. त्यांच्यासाठी आपले संदेश असे असतील जसे आदिमानवांसाठी विमानाची कल्पना !
आता आपण दुसर्या शक्यतेकडे वळूया ..या नुसार जर का आपण असे संदेश पकडले तर आपल्याला त्यांची चाहूल नक्कीच लागेल ! परंतु हे करणे करणे तितकेसे सोपे ( तसेच सुरक्षित) नाही ! कारण आपण याची काहीही हमी देऊ शकत नाही कि आपल्या पृथ्वी वर आलेले अंतराळ यान त्यातील प्रवासी हेय चांगल्या हेतूनेच आले असतील!

WOW सिग्नल

मग आता करायचे तरी काय .. ! या बाबतीतला एक चांगला किस्सा येथे सांगावासा वाटतो ! १६ ऑगस्ट १९७७ रोजी रात्री आकाश नियमित स्कॅन करताना आपल्या संदेशवाहक यंत्रणा ( SATELITES ) एक अजीबोगरीब सिग्नल सापडला.. असा प्रकारच्या संदेशफक्त परग्राहीच पाठवू शकत होते . या कॉम्पुटर ने हा आकडी कोड एकत्र करून त्या कॉम्पुटर संचालकाने ने सर्वात प्रथम तोंडातून उद्गार काढले ( WOW ) आणि तेव्हा पासून याच नावाने हा सिग्नल मशहूर झाला ! खरे पाहता तर हा ( RADIO ACTIVE _ materials ) ने बनला होता .. म्हणूनच हा संदेश इतका प्रसिद्ध झाला.. दुसर्या दिवशी ज्या भागातून हा संदेश आलेला त्याची काटेकोर पणे पाहणी करण्यात आली..अनेकदा उत्तर देखील त्या भागात पाठवले गेले.. परंतु काहीच हाती लागले नाही !

एक गोष्ट मात्र नक्की कि आपण असे अनेक सिग्नल्स पाठवू परंतु त्याला पोहचे पर्यंत १००-२०० पप्रजाशवर्षचा काळ जरी लागला तरी सुद्धा आपल्याला काहीही फायदा होणार नाही.. कारण तोवर ती संस्कृती अजून अद्यावत झाली असेल..तेव्हा तर ते या सिग्नल कडे लक्षही देणार नाही.. आणि जर दिले..लक्ष तर त्यासाठी त्यांनी आपल्याला उत्तर देखील पाठवले तरी परत आपल्याला १००-२०० वर्षे थांबावे लागणार.. तेव्हढ्यात ती संस्कृती नष्ट देखील होऊ शकते ! आपण मानवानी सुद्धा अणुबॉम्ब बनवण्याची कला फार लवकर आत्मसात केली ! खरे तर त्या संस्कृतीच्या विनाशाला खरी सुरवात होतील जेव्हा त्यांना समजेल कि........... (E =Mc Square)

स्टेफन हौकिंग यांचा एक विचार - (माझा छोटा प्रयत्न )

जगातील प्रसिद्ध खगोलशास्त्री स्टीफन हौकिंग यांचे डोके हे कॉम्पुटर पेक्षा जलद चालते ! यांच्या एका सिद्धातंता नुसार जर परग्रही जीव अतिप्रगत असेल तर ते एक योजना बनवतील.. त्यांच्या सूर्य भोवती ते छोट्या छोट्या आरश्यांच्या उपकरणाचे एक मंडळ बनवतील जेणे करून संपूर्ण सूर्य हा त्या आरश्यांच्या आवरणाने झाकून सर्व उर्जा साठवली जाईल.. अश्या प्रकारे या उर्जेचे जर आपण भागात समान विभागणी केली तर आपण विचार पण करू शकणार नाही अश्या प्रकारची उर्जा निर्मिती या प्रकल्पाने होईल.. जेणेकरून लांबचा पल्ला गाठण्य साठी आपल्याला आवश्यक असलेली उर्जा हे लोक अतिशय सहजतेने मिळतील.. त्या साठी गरज हवी फक्त उत्तम इंजीनीअरिंग ची त्याच प्रमाणे अद्यावत उपकरणांची.. मी देखील या विषयावर काही नोटस काढल्या होत्या त्याच आपल्या समोर ठेवत आहेत.. जर हा विचार खरा झाला तर परग्रहीना शोधण्याचे जटील काम हे ८०-८५ % सोपे होऊन जाईल! परंतु तरीसुद्धा आपला हा शोध चालूच राहणार आहे ! या पुढेही...पुढच्या लेखात ..!


Friday, November 18, 2011

रोखठोक - २


सध्या मुंबई मध्ये जे काही चालू आहे ते बघून मनात चीड आली नाही तर नवलच ! गेल्या आठवड्यात ट्वीटर वर बसलेलो असताना " किनेन आणि रुबेन " या २ मित्रान बद्दल समजले.. अंधेरी येथे रात्री हे दोघे मित्र आपल्या मैत्रिणी सोबत जेवायला बाहेर गेले होते.. तेव्हा तेथे काही लोकांनी त्यांच्या मैत्रिणीला त्रास द्यायला सुरवात केली.. या दोघांनी याला विरोध करताच त्यांना अतिशय अमानुष रित्या चोप देऊन मारण्यात आले .. व याच जखमी अवस्थेत त्यांचे निधन झाले ! काय चालू आहे हे ? आपण पाकिस्तानात किवा अफगाणिस्तानात राहत आहोत का ? काही मिनिटे हे वाचून मन अवाकच झाले ! आम्ही मुंबईकर.. मी मुंबईकर म्हणणारे कुठे गेलेले तेव्हा ? त्या दोन मित्रांची मदत करायला कोणी कसे आले नाही ? जर मुंबईत सामान्य नागरिक सुरक्षित नाही तर मग आम्ही जायचे तरी कुठे ! खरेच आपण कसाब ला आंतरराष्टीय पातळीची सुरक्षा देऊ शकतो तर मग सामान्य माणसाला त्याच्या १ % पण सुरक्षा का नाही देऊ शकत ! सानिया -शोएब च्या लग्नाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या "मीडिया" ने देखील याला फारसे महत्व दिले नाही ! परंतु अश्या वेळेस यांच्या मदतीला धावून आला आपला " ट्वीटर" ! त्या दिवसापासून " ट्वीटर" च्या #TAG मध्ये हा टॉपिक सर्वत्र दिसू लागला.. आणि काही अर्थाने का होईन सामान्य मुंबईकर याच्याशी जोडला गेला..!

यात आघाडीचा संगीतकार विशाल ददलानी ( विशाल शेखर या जोडीतला - रा वन चा संगीतकार) यासाठी जीवाचे रान करत होता " ट्वीटर" वर ! काही दिवसान पूर्वी बातमी वाचली कि या प्रकरणी काही लोकांना अतात्क झाली..आता खटला चालू आहे ..असो ! जाता जाता फक्त एवढेच सांगावेसे वाटते कि आपल्याला आपली मानसिकता काही प्रमाणात बदलायला हवी कारण उद्या "किनन - रुबेन" च्या जागी कोणीही असू शकते .. मी किवा तम्ही सुद्धा !

Saturday, October 15, 2011

रोकठोक -१

धर्मसुधारणा ?

आपल्या देशाच्या नशिबातच असे का झाले माहित नाही..परंतु आपल्या देशात अतिशय गंभीर त्याच प्रमाणे अनेक गुंतागुंती च्या समस्या आहेत! त्यातील एक म्हणजे आपला"धर्म" त्याच प्रमाणे "धर्माच्या नावाखाली होणारे अनेक प्रसंग " आज माझ्या या ब्लोग च्या माध्यमाने मी याच विषयावर हात घालत आहे!
एकदा महाविद्यालया मध्ये "धर्म" या विषयावर चर्चा चालू असतानाच मला या विषयावर लिखाण करायचे सुचले! मला माहित आहे काही लोकांना माझा हा लेख आवडणार नाही! पण जे मला कळले.. तसेच पटले आणि महत्वाचे म्हणजे शहानिशा करून योग्य वाटले तेच मी लिहित आहे!

मी स्वतः हिंदू धर्माचा आहे! मी आपल्या धर्माचा प्रसार + प्रचार करणाऱ्या काही संस्थांचे (माफ करा पण मी नाव घेऊ इच्छित नाही) उपक्रम पाहतो! आणि ते बघून मला खरेच खूप वाईट वाटते ! कारण धर्माचा प्रसाच्र तसेच प्रचार करण्या पेक्षा आपण या धर्मातल्या लोकांनी हिंदुना आज इथे बाटवले.. तसेच तिथे बाटवले..आज हा अन्याय केला..उद्या तो अन्याय करतील ह्याच बातम्या पाहतो! खरेच आपले हे वागणे कितपत बरोबर आहे!
याउलट आपल्याला आपल्या धर्मातील काही त्रुटी( ज्यांचा आपले विरोधक सतत समाचार घेतात तसेच तोंडसुख घेतात) त्या लवकरात लवकर सुधारायला पाहिजे ! आपला वेळ हा त्या गोष्टीत घालवला पाहिजे! नुसते अश्या बातम्या छापून काहीही होणार नाही! आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण हे सगळे करून काय साध्य करतो ?

आज आपण अश्या बातम्या पाहतो कि या धर्मात ल्या लोकांनी असा अन्याय केला तसा अन्याय केला.. मग अश्या संघटना काही काळ मागे वूल का पाहत नाही.. कि हिंदुनीच हिंदुंवर कसा अन्याय केला ते ? "मनु स्मृती " हा ग्रंथ एवढ्या लवकर विसरलात ?
" माणुसकी " या शब्दाचा जेथून अंत होतो त्याचप्रमाणे "जातीव्यवस्था " या गोष्टीची सुरवात होते तोच हा ग्रंथ! खरेच या ग्रंथात किती अमानुष अश्या गोष्टी दिल्या होत्या ! आज च्या जमान्यातल्या लोकांना सांगितले तर लोकांना विश्वास वाटणार नाही! तरी एक आवर्जून सांगतो! "मनु स्मृती " मध्ये लिहिल्याप्रमाणे "अस्पुष्य" लोकांना "संस्कृत" भाषा शिकण्याची परवानगी नव्हती ! जर ती कोणी शिकलीच तर त्याच्या कानात शिशाचा तप्त रस ओतावा किवा त्याची जीभ कापावी असा "अतिशय सोपा" उपाय कर्मठ हिंदूंच्या आवडत्या ग्रंथात म्हणजेच "मनु स्मृती " मध्ये लिहिलेय ! पहा आपल्याच ग्रंथात काय लिहिलेय आणि आपण धर्म सुधारणा तसेच धर्म प्रचारासाठी हाहाकार करतो! प्रसंगी "बॉम्बस्फोट" सुद्धा!

धर्माच्या नावाखाली इतकी बोंबाबोंब करणारे लोक स्वतःच्या धर्माची चूक कबूल करणार का ? अन्य कोणत्याही धर्म मधेय पहा जातीव्यवस्था आपल्या धर्म सारखी नाही आहे! मग जर एखाद्या व्यक्तीवर त्या धर्मात अन्याय होत असेल ( त्याचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच नसेल) तर मग तो का नाही जाणार दुसर्याच्या धर्मात ! म्हणून मला स्वतःला असे वाटते कि आपल्या धर्मातल्या लोकांनी उगाच असे काही उपक्रम चालवण्या पेक्षा आधी स्वतःच्या धर्म कडे लक्ष्य द्यावे! कि जगातला सगळ्यात महान धर्म म्हन्रार्या हिंदू धर्मात गेली १५० वर्षे काय होत होते आणि काय सुधारायला पाहिजे हे जरूर पाहावे!

मी आंबेडकरवादी मुळीच नाही! ना मी दलितांची बाजू घेतोय ना हिंदूंची ! धर्माचा खरा प्रसार व्हाव्हा असे वाटत असेल तर या गोष्टी कडे पुन्हा एकदा विचार करायला शिकले पाहिजे! असे कर्मठ वागल्याने आपण धर्माचा प्रसार नाही तर बदनामी करत आहोत! खरेतर आपल्याला दुसर्या धर्मात ल्या लोकांशी मनमोकळे पाने वागले पाहिजे! आपण १ पाऊल पुढे आलो तरच ते सुद्धा येतील ना! उगाच माझाच धर्म महान.माझाच धर्म मोठा..इतरांचा धर्म लहान हे बोलणे अतिशय चुकीचे आहे! काही जण भारताला हिंदुस्थान म्हणतात ! ते सारासार चुकीचे आहे! संविधान निर्मिती पूर्वी जर कोणी म्हणत असेल तर गोष्ट वेगळी आहे! परंतु आज भारताने "संविधान" चा स्वीकार केला आहे! यात स्पष्टपणे लिहिले आहे कि भारत "धर्मनिरपेक्ष" देश आहे! आपल्या धर्मातल्या संघटनांनी हिंदुस्थान लिहिल्याने काय भारत हिंदुस्थान होणार नाही! लोकांना असे वाटते कि असे केल्याने आम्ही धर्माची सेवा करतोय ..प्रसार करतोय! खरेतर अश्याने धर्माची बदनामी होतेय !

हा तर फक्त एक भाग होता ! मला सांगा आपल्याच धर्मात इतके मतभेद असताना आपण धर्म प्रचार कडे वळावे कि धर्म सुधारणे कडे !अजून एक गोष्ट मला खटकते हिंसाचार तसेच बॉम्बस्फोट ने खरेच हिंदूंचे प्रश्न सुटणार आहेत काय? मी गांधी वादी नाही! परंतु मला विनाकारण हिसा मुळीच आवडत नाही! इतर धर्मीय लोकांनी हिंदू "धर्म सुधारणा " करणाऱ्या लोकांचे मुखपत्र वाचून पाहावे! त्यात आपल्या धर्म बद्दल कमी तसेच दुसर्यांच्या धर्मात ल्या लोकांनी हिंदुंवर असे केले तसे केले हेच असते! आपल्या धर्मातील काही धर्म ग्रंथांचा अभ्यास केल्यावर मला आपल्या धर्मातील काही "खोट्या " गोष्टीन बद्दल सुद्धा कळले! ते सुद्धा मी लवकरच येथे पोस्ट करीन! मला खात्री आहे खुपश्या लोकांना ही पोस्ट आवडली नसणार! त्याच वरून मला समजते कि आपल्या धर्माच्या लोकां मध्ये विचार सुधारण्याची खरेच किती गरज आहे! नुसता धर्माचा प्रासार करण्या पेक्षा आपण धर्मात सुधारणा करून "माणुसकी" हाच सर्वात मोठा धर्म आहे याचा प्रचार करायला हवा!



Sunday, September 25, 2011

लालबाग चा राजा - 2011

चिंचपोकळीचा चिंतामणी
श्री गणेशाय नमः !
दरवर्षी प्रमाणे गणपती उत्सवाची मी आतुरतेने वाट बघत होतो ! कारण या कालावधीत आपल्या ब्लॉग चा वाढदिवस असतो ! होय.. आपला ब्लॉग आता चक्क वर्षाचा झाला आहे ! वर्ष पूर्वी गणेश उत्सवात अगदी टाइम पास करत करत छोट्याश्या खोलीत सुरु केलेल्या या उपक्रमाचे आज ६००० हून जास्त भेटी आहेत ! या ब्लॉग ची सुरवात केली होती ती लालबाग च्या राजा च्या पोस्ट ने ! दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील ही परंपरा कायम ठेवत आहे ! लालबाग च्या राजा च्या भेटीचा हा संक्षेप्त वृतांत !

राजा चे पहिले मुखदर्शन !
या वर्षी आमच्या लालबाग च्या राजाला जाणारी काही जुनी मंडळी आली नव्हती .. तसेच - नवीन मंडळी देखील आली ! ( ब्लॉग च्या पहिल्या पोस्ट मधेय उल्लेख केलेला विकास या वेळेस मात्र आला :D ) आम्ही मजल दरमजल करीत - ट्रेन सोडत सोडत अगदी आरामात करी रोड स्टेशन वर उतरलो ! सर्व प्रथम " चिंचपोकळीचा चिंतामणी " पहावयास गेलो.. करी रोड स्टेशन च्या दगडी पायर्या उतरल्या कि समोरच आपल्याला हा गणपती बाप्पा दिसून येतो !


रांगेत उभे असलेले !

त्याला नमस्कार करून आता आम्ही प्रत्यक्ष लाल्नाघ ला जाऊ लागलो होतो.. मधेय विविध खाण्याच्या पदार्थांच्या गाड्या दिसत होत्या ! मोह आवरून आम्ही चालत होतो ! आता आम्ही मुख दर्शनाच्या रांगेत शिरलो होतो ! गेल्या वर्षी सारखी चूक आता या वर्षी आम्ही मात्र गेली नाही ! गेल्या वर्षी आम्ही चुकीचं रांगेत शिरून मागे परत फिरलो होतो .. तसेच तडक घरी जायचा निर्णय घेतला होता ! परंतु देवावार्चाय भक्षी मुले आम्ही माघारी फिरलो परत मुख दर्शनाच्या रांगेत शिरलो आणि दर्शन घेतले ! अर्थात या वेळेस मात्र असे काहीही झाले नाही ! गेल्या वर्षी प्रमाणे या वेळेस सुद्धा आम्ही डोक्यावर "रंगीत शिंगे" घातली होती..! आता एका पाठोपाठ एक करत करत आम्ही एक -एक रंग सोडत चाललो होतो ! आता आम्ही मुख्य प्रवेशद्वारापाशी प्रवेश केला ! आणि मला राजाचाची पहिली वाहिली झलक दिसली ! काय सांगू.. माझ्या मनातले सगळे सगळे काही संपले! माझी विचार करण्याची ताकदच जणू सुन्न झाली होती ! इतके विलोभनीय दृश्य होते ते !

साक्षात राजा !
दरवषी प्रमाणे लालबाग चा राजा या वर्षी सुद्धा मस्त दिसत ओत ! शेवटी राजाच तो आपला :) .. अश्या प्राकडे आम्ही बाप्पाचे दर्शन पूर्ण केले .. मला शक्य तितक्या जवळून तसेच शक्य तितके फोटोस काढून घायचे होते ! ते झाल्यावर आम्ही बाहेर आलो ! तहानलेल्या व्यक्तीला अचानक पणे पाणी मिळाल्यावर त्याची हालत कशी होते ? तशी आता आमची अवस्था झालेली ! आणि आता आम्ही मोर्चा वालाल्वा तडक "पेटपूजे" कडे !
दर्शन घेतल्या नंतर ची मुद्रा :)

लालबाग ला एवढ्या गर्दीत सुद्धा आम्हाला खायला चांगले हॉटेल मिळाले .. आत जाऊन बघतो तर फक्त पाव भाजी मिळेल असे कळले.. लगेच ओर्देर दिली तसेच तव मारला ! आमची पहिली ट्रेन :०७ ची होती ( कसारा ) आता वाजले होते :१५ ..! म्हणजे आम्हाला अजून ४५ मिनिटे तरी काहीतरी टाइम पास करावयाचा होता तर ! आणि आता आम्ही अजून एक गणपती बघितला .. आणि मग सरळ पहिली गाडी पकडून घरी गेलो !

घरी जाताना मनात असा विचार आला.. कि आज तर आपल्या ब्लॉग चा रा वाढदिवस आहे ! घरी गेल्यावर जरूर ब्लॉग लिहीन असा विचार करत करत मी आता निद्राधीन होऊ लागलो होतो ! :):):):):):):)