Friday, December 30, 2011

घोडचूक !


घोडचूक !

हो मी याला घोड्चुकच म्हणीन ! आज अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने सारा देश पेटून उठला आहे ! सरकार ने लोकपाल बिल संसदेत आणले ( परंतु ते अण्णा हजारे यांच्या लोकपाल प्रमाणे नव्हते ) म्हणून त्यांनी पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारले ! वास्तविक मला त्यांचे आंदोलन चुकीचे वाटते ! कारण जनतेला काय हवे आहे हे जनतेने निवडून दिडलेले लोकप्रतिनिधी ठरवणार ! याचा हक्क फक्त त्यांना आहे ! जर असे उपोषण केल्याने कायदे बनत असते तर भारतीय जनता पार्टी वाले पुहा उपोषणाला बसून पोटा कायदा अन्य साठी सरकार वर दबाव आणू शकले असते ! म्हणून उपोषण करून संसदेस वेठीस धरणे हा संसदेचा तसेच लोकशाहीचा अपमान आहे ! अतिशय चुकीचे आहे !



याच्या वर परत अण्णा हजारे यांनी २७ डिसेंबर पासून ३ दिवस उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले ! खरे तर ते इथेच फसले ! त्याच्या या दुसर्या संघर्ष फसण्याची काही कारणाचा मी विचार केला !
१) अण्णा हजारे यांचे आंदोलन यशस्वी होण्यामागे ७० % हून अधिका वाट आहे सोशल मिडिया चा .. परंतु या आंदोलनात मात्र फारसा प्रचार केला गेला नाही !
२) संसदेचे कामकाज अतिशय घाई घाई ने करण्यात आले कारण लगेच नाताळ ची त्याच प्रमाणे नवीन वर्षाची सुट्टी लागणार होती !
३) अण्णा हजारे नेमके हेच विसरले ! त्यांना वाटले कि मुंबई ची जनता सुद्धा राळेगण सिद्धी सारखी त्यांच्या पाठीशी कधीही केव्हाही उभी राहील !
४) परंतु ज्या तरुणाईचा अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठींबा होता ती आता नवीन वर्षाच्या सुट्टी ची तयारी करण्यात मग्न झाली होती ! सहजच तरुणाचा प्रतिसाद कमी मिळाला होता !
५) अण्णा हजारे यांचे आंदोलन हे १६ ऑगस्ट प्रमाणे बेमुदती नव्हते ! ठराविक कालावधी साठी होते त्यामुळे काही लोकांचा तसेच राजकारण्यांचा काहीसा रस निघून गेला ! कारण त्यांना माहित होते कि ३ दिवसा नंतर अण्णा हजारे यांचे उपोषण संपणार आहे !
६) दिल्ली प्रमाणे मुंबईत देखील थंडीची लाट आली आहे त्यामुळे सामान्य मुंबईकर घराबाहेर पडताना सहसा दिसत नाही !
७) ज्या मैदानावर अन्नाचे आंदोलन झाले तिथपासून स्टेशन अतिशय लांबवर होते ! त्यामुळे तिथे पोचणे सहसा सोपे नाही !
८) आंदोलन अतिशय घाई घाईत केले गेले ! तसेच अण्णा हजारे यांची प्रकृती बरी नसताना देखील त्यांना उपोषणाला बसायला लावले !
९) मागील काही दिवसान पासून टीम अण्णा च्या सदस्यांची बिघडलेली छबी तसेच अण्णा हजारे यांच्या ब्लॉग वरून झालेला राजू परुळेकर यांचा विवाद !


म्हणून लोकपाल च्या मुद्द्यावर मी सांगू इच्छितो कि जर का पुन्हा एखादे आंदोलन करायचे असेल तर ते घाई घाईत न करता सावकाशपणे विचार विनिमय करूनच करावे !
गेल्यावेळेस यशस्वी झालेले केजरीवाल भूषण तसेच बेदी ना या संग्रामात मात्र सपशेल अपयश आले ! जाता जाता असाच विश्वास व्यक्त करूं कि पुढील वर्षात १ मजबूत लोकपाल बिल नक्की आपल्याला पहावयास मिळेल !

0 comments: